फलटण (आपलं फलटण) येथील रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत समाजसेवेचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नागरिकांसाठी पाणी वाटपाचा उपक्रम हाती घेत संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली.
उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देणारा हा उपक्रम ठरला. कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष इम्रान सिकंदर सय्यद, उपाध्यक्ष अतुल शाह, खजिनदार कैफ शेख, संचालिका शाहीन शेख, रझिया शेख, माया बनसोडे, अनिसा सय्यद, प्रीती शाह, हिना सय्यद, मंगल जाधव सदस्य उपस्थित होते.
पत्रकार डिजिटल मीडिया प्रतिनिधी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, संचालक व सभासद यांनीही उपस्थित राहून उपक्रमास सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे सहकार्य लाभल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.






