फलटण( आपलं फलटण ) श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त विठ्ठलवाडी येथे दुग्धजन्य पदार्थ निर्मिती विषयावर विशेष प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
ग्रामीण भागातील महिला व विद्यार्थ्यांना दुग्ध प्रक्रिया उद्योगातील संधींची माहिती मिळावी तसेच स्वावलंबन व ग्रामीण उद्योजकतेला चालना मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बासुंदी तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी दूध योग्य पद्धतीने उकळणे, साखरेचे संतुलित प्रमाण, सुकामेव्याचा वापर तसेच चव, गुणवत्ता आणि सादरीकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे व प्रा. नितीषा पंडित तसेच कृषी अभियांत्रिकी मार्गदर्शिका प्रा. आर. डी. नाईकवाडी व प्रा. आर. व्ही. करचे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषीदूत साहिल आतकिरे, सुमित शितोळे, ओंकार गारगोटी, धीरज पाटील, सोहम गरड, वैभवराज सुरवसे आणि तुषार ठेंगल यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यक्रम प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि ग्रामीण महिलांसाठी उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








