शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य


आपलं फलटण प्रतिनिधी :

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. मात्र गेल्या काही दशकांत रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे जमिनीचे आरोग्य, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीचा विचार केवळ पर्याय नसून काळाची गरज बनला आहे.
ही गरज ओळखून के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सचिन यादव यांनी सेंद्रिय शेतीची व्यापक चळवळ उभारण्याचे ध्येय स्वीकारले. त्यांनी कार्यालयापुरते मर्यादित न राहता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. आधुनिक संशोधन, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली.
के. बी. ग्रुपने संशोधनाधारित, वनस्पतीजन्य आणि पर्यावरणपूरक सेंद्रिय खतांची व कृषी उत्पादनांची निर्मिती करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे उत्पादनाचा दर्जा सुधारण्याबरोबरच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास आणि उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होत आहे. सुरक्षित अन्ननिर्मिती आणि निरोगी समाज घडविण्याच्या दिशेने हे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे.
“प्रत्येक ताटात सेंद्रिय अन्न” हा केवळ घोषवाक्य नसून श्री. सचिन यादव यांनी स्वीकारलेले सामाजिक ध्येय आहे. रासायनिक शेतीमुळे भविष्यात निर्माण होणारे आरोग्यविषयक धोके ओळखून त्यांनी सेंद्रिय शेतीचा जो दूरदृष्टीपूर्ण मार्ग स्वीकारला, तो आज हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या उपक्रमाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत.
राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त अशा दूरदृष्टी असलेल्या कृषी उद्योजकाच्या कार्याचा गौरव करणे हीच खरी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता ठरेल. शेती, पर्यावरण आणि मानवाचे आरोग्य यांचा समतोल राखत सेंद्रिय शेतीची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी श्री. सचिन यादव यांचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे.
शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. सेंद्रिय शेतीचा प्रसार, सुरक्षित अन्ननिर्मिती आणि शाश्वत कृषी विकासाचा संकल्प अधिक बळकट करण्याची हीच वेळ आहे. राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि सेंद्रिय शेतीच्या या परिवर्तनशील वाटचालीला सलाम!

शब्दांकन हेमंत खलाटे

Spread the love
  • Related Posts

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    आपलं फलटण प्रतिनिधीसातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, साहित्यप्रेमी व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व कै. प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.००…

    Spread the love

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    आपलं फलटण प्रतिनिधी भारतीय शेती एका नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभी आहे. वाढते उत्पादन, बदलते हवामान, रासायनिक अवशेषांबाबत वाढती जागरूकता आणि निर्यातीसाठी अधिक कठोर होत जाणारे कमाल अवशेष मर्यादा (एम.आर.एल.) निकष…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज     भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन
    error: Content is protected !!