शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य


आपलं फलटण प्रतिनिधी :

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. मात्र गेल्या काही दशकांत रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे जमिनीचे आरोग्य, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीचा विचार केवळ पर्याय नसून काळाची गरज बनला आहे.
ही गरज ओळखून के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सचिन यादव यांनी सेंद्रिय शेतीची व्यापक चळवळ उभारण्याचे ध्येय स्वीकारले. त्यांनी कार्यालयापुरते मर्यादित न राहता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. आधुनिक संशोधन, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली.
के. बी. ग्रुपने संशोधनाधारित, वनस्पतीजन्य आणि पर्यावरणपूरक सेंद्रिय खतांची व कृषी उत्पादनांची निर्मिती करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे उत्पादनाचा दर्जा सुधारण्याबरोबरच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास आणि उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होत आहे. सुरक्षित अन्ननिर्मिती आणि निरोगी समाज घडविण्याच्या दिशेने हे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे.
“प्रत्येक ताटात सेंद्रिय अन्न” हा केवळ घोषवाक्य नसून श्री. सचिन यादव यांनी स्वीकारलेले सामाजिक ध्येय आहे. रासायनिक शेतीमुळे भविष्यात निर्माण होणारे आरोग्यविषयक धोके ओळखून त्यांनी सेंद्रिय शेतीचा जो दूरदृष्टीपूर्ण मार्ग स्वीकारला, तो आज हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या उपक्रमाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत.
राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त अशा दूरदृष्टी असलेल्या कृषी उद्योजकाच्या कार्याचा गौरव करणे हीच खरी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता ठरेल. शेती, पर्यावरण आणि मानवाचे आरोग्य यांचा समतोल राखत सेंद्रिय शेतीची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी श्री. सचिन यादव यांचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे.
शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. सेंद्रिय शेतीचा प्रसार, सुरक्षित अन्ननिर्मिती आणि शाश्वत कृषी विकासाचा संकल्प अधिक बळकट करण्याची हीच वेळ आहे. राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि सेंद्रिय शेतीच्या या परिवर्तनशील वाटचालीला सलाम!

शब्दांकन हेमंत खलाटे

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…

    Spread the love

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण प्रांत कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी कारवाई केल्याची माहिती समोर आली…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!