फलटण ( आपलं फलटण) स्पर्धा परीक्षांच्या कठीण प्रवासात सातत्य, चिकाटी आणि ध्येयाप्रती निष्ठा यांचा संगम साधत येथील युवा मयुरजी नंदकुमार अभंग ऊर्फ बबलू भैय्या यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर मिळकावलेले यश फलटण विडणीकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
स्व कृष्णराव अभंग ऊर्फ गांधी आण्णा यांचे नातू असलेल्या मयुरजींनी कुटुंबातील सामाजिक बांधिलकी आणि प्रामाणिकतेचे मूल्य जपत आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप पाडली आहे. साध्या पार्श्वभूमीतून येत असतानाही त्यांनी मोठे स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन त्यांनी आपले ध्येय पूर्ण केले
त्यांच्या या यशामुळे अभंग कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. युवकांसाठी मयुरजींचा प्रवास प्रेरणादायी ठरत असून “परिश्रमाला पर्याय नाही” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
यशस्वी वाटचालीत कुटुंबीयांचे पाठबळ, मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अथक मेहनत यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात पोलीस सेवेत कार्य करताना समाजासाठी निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे.






